Friday, June 21, 2013

काळजाचा एक ठोका जो कधी थांबलेला,
आज आठवणींनी तुझ्या पुन्हा चुकलाच आहे,
डोळ्यात कधी आटलेले अश्रू ,
अचानकच गालावरी ओघळीत आहे.....
स्वप्नं कधी विसरलेले ,
आज अचानक पुन्हा पहिले आहे,
रागचे नि प्रेमाचे धागे तुटलेले कधी,
आज अचानक गुंफीत आहे...........
नात्याला नाव न जरी या,
आठवणीचे गाव आहे,
पुन्हा परतीची अशा जरी ना,
मनातं तोची भाव आहे...........
-राहुल

No comments:

Post a Comment