Friday, June 21, 2013

प्रेम कविता


उगवत्या नव्या सूर्याला
मी रोजच पाहत आहे
ज्या वळणावर साथ आपली सुटली
तिथे कधीची मी तुझी वाट पाहत आहे

तू दिलेस वचन मला
येशील तू इथे पुन्हा
मी मात्र आहे इथेच
यात आहे का माझा काही गुन्हा

आपली निसर्गाने देखील
ती वाट सजवली
पहावया आपुले मिलनाचे दृश्य
साऱ्यांची नजर आतुरलेली

सायंकाळच्या मंदावत्या सूर्यप्रकाशात
शोधे सारे वाट परतीचा
मी मात्र एकटाच येथे रेंगाळत
नाही मजला साथ तुझ्याविना कुणाचा

नाही करू शकलो माफ
आजही मी स्वतःला
ब्रम्हात वेड्या पडून
उगाच तुला मी दिले जायायाला

दिलेस वचन तू आपल्या प्रेमाची
येशील तू लवकर परतुनी
मनात फुटती अंकुर सवंशयाची
गेलीस खोटे वचन तू देवूनी...

-राहुल

विरह कविता


तुझ्याशी आज खुप बोलाव वाटत होत,
पण सुचत काही नव्हत..
मनात खुप काही साचलेल होत,
पण तुझ्या कोणत्याच प्रश्नाच उत्तर सापडत नव्हत..
तु पाहिलेल स्वप्न मला आपल वाटत होत,
पण तुझ्या स्वप्नांन मध्ये फक्त माझच स्थान नव्हत..
सगळ्यांन साठी मी होतो,
पण खर तय या जगात माझ कोणीच नव्हत..
मला पण वाटायच आपल कोणीतरी असाव,फक्त माझ्यासाठीच जगणार
माझ्या सोबत हसणार,माझ्या सोबत रडणार..
नात्यांचे बंध जोपासणार,शेवटपर्यंत नाते टिकवणार..
मी नसल्यावर माझी आठवण काढणार..
पण कोणीच नाही अस मी मेल्यानंतर पण माझ्यासाठी रडणार.......!
-राहुल

प्रेम कविता


प्रेम करून बघ
तू प्रेम करून बघ

दिसेल तुला सारे
डोळ्यात आसवांचे किनारे
प्रीतीच्या तालात सुरांचे वारे

साडौल ह्या जीवनात
तू फक्त एकदाच वळून बघ
प्रेम करून बघ
तू प्रेम करून बघ

तुझाच विचार असतो रोज माझ्या मनी
तुलाच तर पाहून म्हणत असतो मी गाणी
तुझं चालणं, तुझं बोलणं असतं माझ्या ध्यानी
तूच तर आहेस ग माझ्या स्वप्नातली राणी

असल्या माझ्या मनाचा
विचार तर करून बघ
प्रेम करून बघ
तू प्रेम करून बघ


-राहुल
पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण ...
आजही घालतात साद मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...
तुझ्या आठवणित गुंफतात मला, या पहिल्या पावसाच्या सरी ...

नकळत हात तुझा हातात येता,
उमललेली ह्दयाची कळी ...
वाढलेले ह्दयाचे ठोके,
तुने करिता चावट खोडी ..

पावसात चिंब भिजताना,
तुला पाहन्याचा तो आनंद ...
ढगांच्या गर्जनाने तुझा,
माझ्या मीठीत येण्याचा तो प्रसंग ...

तो थेंब पावसाचा, तुझ्या गालावरती थांबलेला ..
घेताना मीठीत तुला, माझ्या ओठांनी मी टीपलेला ..
सोबतिला असलेला मातिचा ही गंध,
अजूनही आहे श्वासात माझ्या, तुझ्या गजर्‍याचा सुगंध ..

कितीतरी अशा आठवणि, आनी बरेच असे क्षण,
पडत असतो पाऊस बाहेर, आनी आतमध्ये रडते माझे मन ..

असा हा पाऊस वेडा, नेहमिच तुझी आठवण घेऊन येतो,
होताना एकरूप मातीशी, माझ्या पापण्यांना ओल करून जातो ..

पहिला पाऊस, पहिली आठवण,
पहिल्या पावसातले ते अविस्मरणिय क्षण .....................

-राहुल

प्रेम


प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...

ऐकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी...

प्रेम म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे......

-राहुल

शेवटची भेट...


भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला

निरोप तुला देतांना अश्रू माझे वाहतील
काळजाच्या तुकड्यांना सोबत वाहून नेतील

त्या वाहणाऱ्या अश्रुतही प्रतिबिंब तुझेच असेल
नीट निरखून पहा त्यांना, प्राण त्यात माझा दिसेल

वाट आपली दुभंगली आता पुन्हा भेटणे नाही
प्रवास जरी एक आपला मार्ग एक होणे नाही

आठवण तू ठेवू नकोस, मी कधीच विसरणार नाही
भेटणे तुझे अशक्य तरी वाट पाहणे सोडणार नाही

जातेस पण जातांना एवढे सांगून जाशील का?
भेटलोच जर कधी आपण ओळख तरी देशील का?

जाता जाता थोडे तरी मागे वळून पाहशील का?
प्रत्येक्षात नाही तरी डोळ्यांनी काही बोलशील का?

बोलली नाही तू जरी, नजर तुझी बोलेल
गोंधळलेल्या अंत:कर्णाची खबर मला सांगेल

कोठेतरी हृदयात इतिहास सारा आठवशील
तो आठवण्या पुरता तरी, तू नक्कीच माझी राहशील!

नजरेने जरी ओळखलेस तू, शब्दांनी मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळ आणणार नाही

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शप्पत सांगतो.... पुन्हा प्रेम करणार नाही.......
-राहुल
बोलणारा सहज बोलुन जातो,त्याला कुठ माहीत असत ऐकणरच्या मनावर शब्द ना शब्द कोरला जातो...
जाणारा सहज जगाचा निरोप घेतो,त्याला कुठ माहीत असत त्याच्या मागे कुणीतरी रडत असत...
वेळ न थांबता निघून जाते,तिला कुठ माहीत असत तिच्यामुळे कोणालातरी फार उशीर होतो...
जीव लावणार कुणी भेटल की इतका लळा लागतो,पण त्याला कुठे माहीत असत जीव लावुन कुणीतरी दुर जाणार असतं...........
-राहुल
तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशीवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस .....
-राहुल
सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना
जशी रात्र चंद्राविना
जसा मानव भावनांविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
जसे झाड पानांविना
जसे फुल सुगंधाविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
जसा समुद्र पाण्याविना
जसा दिवस सुर्याविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
जशी बाग् फुलंविना
जसे आकश चांदण्यांविना
सांग तु माझीच ना
कसे जगावे तुझ्याविना
कसे जगावे तुझ्याविना
-राहुल