Friday, June 21, 2013

तुझं उमलणं, तुझं बहरणं,
तुझ्या डोळ्यांत माझं हरवणं...
हेच माझं विश्व म्हणत,
अवती-भवती तुला धुंडाळणं...
माझ्यापाशी राहिलं काय?
माझं असं होतं काय?
कसं सांगू तुला आता... तू नसताना होतं काय??

उन्हातलं चांदणं, चांदण्यातलं ऊन,
यातला फरक कळतो काय?
बुध्दीची ओरड, मनाची हुरहुर....
अन् विजय मनाचाच होतो काय?
नको विचारूस पुन्हा मला, तू नसताना होतं काय?

नुकतंच दूर गेल्यावरही,
वर्षांचा भास होतो काय?
गोड आठवणी, मृदू भावना,
ओढ यांची लगते काय?
कसं सांगू तुला आता, तू नसताना होतं काय??

आपलं माणूस जवळ असावं,
भावना हट्टी होते काय?
येण्याच्या तुझ्या वाटेकडे,
नकळत डोळे लागतात काय?
नको विचारूस पुन्हा पुन्हा तू नसताना होतं काय??
-राहुल

No comments:

Post a Comment